MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया! (भाग २)
- अभिजीत कदम.
आम्ही पुण्यात आलो. NFAI ला दहा दिवस चित्रपट रसग्रहण कार्यशाळा पूर्ण केली. आतापर्यंत फक्त नाव वाचलेल्या मृणाल सेन यांचा भुवन शोम पहिला, सत्यजित रे यांच्या apu triology मधील पथेर पांचाली पहिला. अनेक मान्यवरांची व्याख्यानं झाली. अनेक नव्या गोष्टी समजल्या, अनेक जुन्याच गोष्टी नव्याने समजल्या. राशोमोनचं screening काही कारणांनी रद्द झालेलं. किशोरदांनी राशोमोन-अकिरा कुरोसावा याबद्दल खूप सांगितलेलं, त्यामुळं खूप उत्सुकता होती, पण screening रद्द झाल्यानं वाईट वाटलं. पण मी कोल्हापूरला गेल्यावर पहिला राशोमोन मिळवून पहिला. किशोरदांनी बर्गमन यांच्याबद्दलही खूप सांगितलेलं. नंतर KIFF ला wild strawberries पाहायला मिळाला. NFAI च्या वर्कशॉपमधले लक्षात राहिलेले आणखी चित्रपट Bicycle Thieves, run lola run, the cup हे होते. Big city blues आणि आणखी एक शॉर्टफिल्म जिचं नाव आता आठवत नाही त्या लक्षात राहिल्या. अस्तू दुसऱ्यांदा पहिला, आणि कोर्ट तिसऱ्यांदा. चित्रपट पाहून झाल्यावर त्याबद्दल आत चर्चा व्हायची आणि बाहेर मी आणि किशोरदा , विषय फक्त सिनेमा. रात्री उशिरा NFAI पासून लकडी पुलाकडं चालत येत, आणि त्या पुलाच्या काठड्याजवळ उशिरापर्यंत सिनेमाबद्दल मारलेल्या गप्पा अजून आठवतात.
कार्यशाळेत डॉ. वनारसे मॅडम, गणेश मतकरी, सुषमा दातार मॅडम यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. सिनेमाच्या प्रचंड प्रेमात असणारी सतीश जकातदार , सुधीर नांदगावकर अशी माणसं पहिली.
समारोपाला गोविंद निहलानी आले होते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण नाही जमलं. त्यांना समोर पाहता आलं, त्यांच्यासोबत फोटो काढला. मराठीतील माझा आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी समारोपाला आले होते. त्यांच्याशी मात्र आम्हाला बऱ्यापैकी बोलता आलं. "कथा दोन गणपतरावांची" मला खूप आवडला होता. आणि त्याचे दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्याशीही बोलता आलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, डॉ. आगाशे यांच्यासोबत प्रश्नोत्तराच सेशन झालं अस्तूच्या screning नंतर. कोर्टमधील पब्लिक prosecutor ची भूमिका केलेल्या गीतांजली कुलकर्णी यांच्याशीही बोलणं झालं. या सगळ्यांमुळ ती कार्यशाळा कायम लक्षात राहीलच, पण त्या कार्यशाळेत एक वादळी व्याख्यान मात्र विशेषकरून आठवतं ते समर नाखातेंच. त्या एक-दीड तासाच्या सेक्शनमध्ये त्यांनी सिनेमा आणि एकंदरीत mass media कडं पाहायचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सिनेमा आणि mass media समाजाला कसं नियंत्रित करतो याचा विचार कधीच केला नव्हता. अजूनही वेळ मिळाला तर त्यांची कार्यशाळा नक्की करणार आहे.
असे ते कार्यशाळेत दिवस प्रचंड भारलेले होते. ज्ञानदेव या माझ्या मित्राकड मी थांबलो होतो. सकाळी आवरून खांद्याला शबनम पिशवी अडकवून, अंगात नेहरुवजा शर्ट घालून मी निघायचो. तिथपासून झोपेपर्यंत डोक्यात आणि समोर फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमा होता.
कार्यशाळा ११ सप्टेंबरला संपली. १२ पासून राज्यसेवा mains होती. मी पहिल्या दिवशीचे भाषेचे पेपर दिले. पण डोक्यात फक्त आधीच्या एक आठवड्यातील सगळ्या गोष्टी फिरत होत्या. १३ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी GS चे पेपर सुरू झाले. १३ ला माझा २५ वा जन्मदिवसही होता. मी GS १ चा पेपर दिला. परिक्षागृहात मी पेपर समोर धरून बसलो होतो. अभ्यास झाला नव्हताच आणि डोक्यात सारखे ते चित्रपट घुमत होते. अभ्यास न झाल्यानं वाईट वाटलं. मी दुसरा GS २ चा पेपर दिला नाही. तसाच रूमवर आलो. माझी शबनम पिशवी घेतली, ज्यात कार्यशाळेत खरेदी केलेली पुस्तकं होती. मी अप्पा बळवंत चौकात जाऊन आणखी एकदोन पुस्तक घेतली. मग बालगंधर्व कलादालनात कुठलतरी प्रदर्शन लागलेलं ते पाहिलं आणि बाहेर येऊन पाच साडेपाचपर्यंत पुस्तकं वाचत बसलो. "अर्धसत्य" ज्या मूळ कथेवरून बनवलेला होता ती श्री. दा. पानवलकरांची बहुतेक "सुर्या" ही कथाही त्यावेळी वाचल्याचं चांगलं आठवतंय. मग संध्याकाळी रूमवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला आलो.
त्यानंतर सलग तीन वर्षे मला राज्यसेवा पूर्व पास होता आलं नाही. दरम्यान आणखी भरपूर चित्रपट पाहून झाले. दरवर्षीचे KIFF झाले, नाट्यस्पर्धा झाल्या. पुण्यातल्या कार्यशाळेला जाण्याआधीच किशोरदांच BDO म्हणून selection झालं होतं. त्यांची सुरुवातीला रत्नागिरी आणि आता फलटणला posting झाली आणि मग परत "आली लहर केला कहर" असला कार्यक्रमही झाला नाही. KIFF साठी मला नवे जोडीदार मिळाले माझे दुसरे roommate रवीदा. कोल्हापुरातील राज्य नाट्य स्पर्धांची जवळजवळ सगळी नाटक मी, शिवराज, किरण, रवी, धीरज, अनिकेत, अनिरुद्ध सगळ्यांनी न चुकता पहिली. जवळजवळ प्रत्येक शनिवारचा release कोल्हापुरात मी मित्रांबर आणि कुणी नसेल तर एकट्याने पहिला.
दरवर्षी राज्यसेवेची जाहिरातही येत राहिली. जाहिरात आल्यावर न चुकता आणि मनापासून अभ्यास आणि परीक्षा देत राहिलो. पण एक अडचण प्रत्येकवेळी व्हायची. अभ्यास करताना एखाद्या गोष्टींबद्दलचं कुतुहल जागृत व्हायचं आणि मग त्या गोष्टीबद्दलच जास्तीत जास्त जाणून घ्यायला लागायचो आणि फिरून शेवट सिनेमात व्हायचा. म्हणजे दोन्ही एकमेकात मिसळून जायचं. मी २०१७ मध्ये "हिंदू" वाचायला घेतली. पहिली दोन-तीनच पानं वाचून झाली आणि मला जाणवलं की पाहिलं मी प्राचीन भारत नीट वाचला पाहीजे. दरम्यान राज्यसेवा पूर्वपरीक्षाही आली होतीच. मग मी जुन्या NCERT मधून प्राचीन भारत वाचायला सुरुवात केली. मग हडप्पा बद्दल आणखी वाचू वाटलं मग नव्या NCERT मधील तेवढी प्रकरण वाचली. आणि मग श्याम बेनेगल यांचे "भारत एक खोज" चे एपिसोड बघायला लागलो. यातच भरपूर वेळ गेला. बाकी विषयांना जास्त वेळ मिळाला नाही. परीक्षा पास होता आली नाही. गेल्यावर्षी "भारत एक खोज"चे राहिलेले सगळे episodes पाहिले आणि "हिंदू" वाचून पूर्ण केली. भारताच्या इतिहासात कालातीत भ्रमण करणाऱ्या आणि आदिम कृषिसंस्कृतीशी जोडलेली नाळ याची जाणीव निर्माण करणाऱ्या नेमाडेंच्या "हिंदू"साठी प्राचीन-मध्ययुगीन इतिहास माहीत असणं ही गरज होतीच. "हिंदु"बद्दलही लिहायचं आहेच, वर्तमानाच्या संदर्भात तर ती जास्तच प्रासंगिक आहे, पण त्याबद्दल नंतर लिहीन.
भारत एक खोज झाल्यानंतर "संविधान" संपवली. मग मात्र इतिहासातले काही चरित्रपट पाहिले. रिचर्ड अटेनबर्ग यांचा "गांधी", जब्बार पटेलांचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर" पहिला. वेद राही यांचा "वीर सावरकर" पहिला. श्याम बेनेगल यांची पंडित नेहरुंवरील "नेहरू" ही डॉक्युमेंटरी पहिली, त्यांचाच "नेताजी बोस : द फरगॉटन हिरो" पहिला. तरी केतन मेहतांचा "सरदार" आणि जिनांवरील ब्रिटिश चरित्रपट राहिलाच. एकंदरीत २०१८ हे वर्ष माझ्या ऐतिहासिक चित्रपट महोत्सवाचं वर्ष होतं.
डिसेंबर उजाडला. १० डिसेंबर २०१८, राज्यसेवेची जाहिरात आली. मी ऐतिहासिक चित्रपट महोत्सव थांबवला. अभ्यास परत सुरू झाला. १७ फेब्रुवारी ला पूर्वपरीक्षा आहे. मला अभ्यासात चालू घडामोडी अभ्यासायला जास्त आवडतात. बरीच नवी माहिती मिळते, नव्या गोष्टी समजतात.
काल ऑफिसवरून घरी आल्यावर जेवण झाल्यावर गणितं सोडवत बसलो होतो. नंतर सकाळची वार्षिकी वाचायला घेतली. आवडीचा (आणि प्रश्न येऊ शकणारा) व्यक्तिविशेष हा भाग वाचायला सुरू केला. आणि संतुरवादक पंडित उल्हास बापट यांच्याबद्दल वाचू लागलो. त्यात पुढील उल्लेख होते :
'या वाद्यावर त्यांनी "मिंड" किमया विकसित केली आणि अविरत संशोधनातून क्रोमॅटिक संतुरचा जन्म झाला.'
पुढं पंचमदांबरोबर "घर" चित्रपटापासून त्यांनी संतूर वाजवायला सुरुवात केल्याचा आणि "इजाजत", "जैत रे जैत", "१९४२ a love story" साठी त्यांनी संतूर वाजवल्याचं वाचलं.
मी पुस्तक बंद केलं आणि youtube वर पंडित उल्हास बापट search केलं. त्यांच्या एका कार्यक्रमाचा एक video मिळाला. तो पहिला आणि मी त्यात हरवून गेलो. त्यांनी शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत दोन्हीत काम केलंय. शास्त्रीय सांगितातले काही जाणकार सिनेमाच्या संगिताला कमी प्रतीचं मानतात तर इंडस्ट्रीतील काही लोक शास्त्रीय संगीताला महत्व देत नाहीत. पण दोन्ही महत्वाची आहेत असही ते सांगतात. त्यांनी मिंड म्हणजे काय ते वाजवून दाखवलं. त्या व्हिडिओत त्यांनी पंचमदांना मिंडच रेकॉर्डिंग ऐकवल्याचं आणि त्यांना ते खूप आवडल्याचं सांगितलं. "तुने ये कैसे किया?" असं विचारून याचा वापर आपण करू असं पंचमदा त्यांना म्हणाले. पंचमदांनी त्याचा वापर "मेरा कुछ समान" मध्ये केल्याचं समजलं. मेरा कुछ सामान मध्ये "...पतझड है कुछ...है ना" यानंतर वाजणारं संतूर, "होठो पे बीती बात आयी है...(अंगुर)" या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये वाजणार संतूर. गाणं ऐकताना हात नकळत ज्या आवाजाबरं हवेत फिरायचा,ते वाजणारं काय होतं याचा कधी विचार केला नव्हता पण ते आवडायचं मात्र खूप. या दोन्ही आवडीच्या गाण्यातल्या नकळत आवडत्या जागा संतूरमुळं मला आवडत होत्या. हे सगळं ऐकून मी पुन्हा ती दोन्ही गाणी बारकाईनं ऐकली आणि त्या संतुरचा आनंद घेतला. पूर्वी ती गाणी ऐकताना शब्द ऐकण्यावर भर होता. उल्हास बापटांनी पंचमदांना अगदी "१९४२ a love story" पर्यंत साथ दिली. त्यातल्या गाण्यातही त्यांचंच संतूर आहे. ते अजून ऐकायचंय. "मेरा कुछ सामान.." तर फिरून फिरून कुठल्यातरी निमित्तानं समोर येतच राहत! गुलजार नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो.
खरं तर अभ्यासातही शिस्त पाहिजे. मी तेवढं वाचून पुढं जायला हवं होतं. पण तेवढ्या दोन परिच्छेदांवरून मी तास-दिडतास पंडित बापटांच्या संतुरमध्ये हरवून गेलो. मग भानावर आल्यावर मला जुनं सगळं आठवलं. पण जर मी तेवढा परिच्छेद वाचून पुढं गेलो असतो तर कदाचित माझा वेळ गेला नसता, आणखी वाचून झालं असतं. कदाचित हे दोन परिच्छेद वाचले त्यावर प्रश्न येणारही नाही. पण त्या गेलेल्या दीड तासाने मला खूप आनंद दिला, त्याची किंमत नाही होऊ शकत.
अणुबॉम्बमध्ये साखळी अभिक्रिया होऊन प्रचंड मोठा स्फोट होतो. ती अनियंत्रित साखळी अभिक्रिया असते. बाहेर पडणारे neutron आणि निर्माण होणारे तिप्पट neutron हे अनियंत्रित साखळी अभिक्रियेद्वारे क्षणार्धात मोठा स्फोट घडवून आणतात. वीजनिर्मितीसाठी वापरली जाणारी अणुऊर्जा मात्र नियंत्रित साखळी अभिक्रियेतून निर्माण होते. तिथं एक शिस्त असते. माझ्या MPSC च्या अभ्यासातून बाहेर पडणारे कुतूहलाचे कण मला चित्रपटांकडे नेतात आणि तिथून परत MPSC च्या अभ्यासाकडे आणतात. अशी साखळी अभिक्रिया कधीच सुरू झालीय. अनियंत्रित साखळी अभिक्रियेत लगेच होणारा स्फोट माझ्या बाबतीत लगेच होईल. वेळ सापेक्ष आहे. आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्षे म्हणजे interstellar मधील दुसऱ्या सूर्यमालेतल्या ग्रहावरील काही तास असतील. तिथल्या हिशेबान स्फोट पंधरा मिनिटं, अर्धा तास किंवा तासात होईलच. त्या स्फोटाने कुणाचं नुकसान मात्र होणार नाही. आनंद देणारा स्फोट असेल तो. तोपर्यंत MPSC च्या बाबतीत एकतर हवी ती post मिळेल नाहीतर परीक्षा देण्याचं वय संपेल. काहीतरी होईलच. सिनेमा आणि MPSC मुळं निर्माण झालेलं कुतूहल मात्र शेवटपर्यंत राहीलच.
पंडित उल्हास बापटांचा youtube वरील कार्यक्रम :
https://youtu.be/v45WeOwKk9I
https://youtu.be/Mqit4mp0Swo
(पूर्ण.)
- अभिजीत.
- अभिजीत कदम.
आम्ही पुण्यात आलो. NFAI ला दहा दिवस चित्रपट रसग्रहण कार्यशाळा पूर्ण केली. आतापर्यंत फक्त नाव वाचलेल्या मृणाल सेन यांचा भुवन शोम पहिला, सत्यजित रे यांच्या apu triology मधील पथेर पांचाली पहिला. अनेक मान्यवरांची व्याख्यानं झाली. अनेक नव्या गोष्टी समजल्या, अनेक जुन्याच गोष्टी नव्याने समजल्या. राशोमोनचं screening काही कारणांनी रद्द झालेलं. किशोरदांनी राशोमोन-अकिरा कुरोसावा याबद्दल खूप सांगितलेलं, त्यामुळं खूप उत्सुकता होती, पण screening रद्द झाल्यानं वाईट वाटलं. पण मी कोल्हापूरला गेल्यावर पहिला राशोमोन मिळवून पहिला. किशोरदांनी बर्गमन यांच्याबद्दलही खूप सांगितलेलं. नंतर KIFF ला wild strawberries पाहायला मिळाला. NFAI च्या वर्कशॉपमधले लक्षात राहिलेले आणखी चित्रपट Bicycle Thieves, run lola run, the cup हे होते. Big city blues आणि आणखी एक शॉर्टफिल्म जिचं नाव आता आठवत नाही त्या लक्षात राहिल्या. अस्तू दुसऱ्यांदा पहिला, आणि कोर्ट तिसऱ्यांदा. चित्रपट पाहून झाल्यावर त्याबद्दल आत चर्चा व्हायची आणि बाहेर मी आणि किशोरदा , विषय फक्त सिनेमा. रात्री उशिरा NFAI पासून लकडी पुलाकडं चालत येत, आणि त्या पुलाच्या काठड्याजवळ उशिरापर्यंत सिनेमाबद्दल मारलेल्या गप्पा अजून आठवतात.
कार्यशाळेत डॉ. वनारसे मॅडम, गणेश मतकरी, सुषमा दातार मॅडम यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. सिनेमाच्या प्रचंड प्रेमात असणारी सतीश जकातदार , सुधीर नांदगावकर अशी माणसं पहिली.
समारोपाला गोविंद निहलानी आले होते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण नाही जमलं. त्यांना समोर पाहता आलं, त्यांच्यासोबत फोटो काढला. मराठीतील माझा आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी समारोपाला आले होते. त्यांच्याशी मात्र आम्हाला बऱ्यापैकी बोलता आलं. "कथा दोन गणपतरावांची" मला खूप आवडला होता. आणि त्याचे दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्याशीही बोलता आलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, डॉ. आगाशे यांच्यासोबत प्रश्नोत्तराच सेशन झालं अस्तूच्या screning नंतर. कोर्टमधील पब्लिक prosecutor ची भूमिका केलेल्या गीतांजली कुलकर्णी यांच्याशीही बोलणं झालं. या सगळ्यांमुळ ती कार्यशाळा कायम लक्षात राहीलच, पण त्या कार्यशाळेत एक वादळी व्याख्यान मात्र विशेषकरून आठवतं ते समर नाखातेंच. त्या एक-दीड तासाच्या सेक्शनमध्ये त्यांनी सिनेमा आणि एकंदरीत mass media कडं पाहायचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सिनेमा आणि mass media समाजाला कसं नियंत्रित करतो याचा विचार कधीच केला नव्हता. अजूनही वेळ मिळाला तर त्यांची कार्यशाळा नक्की करणार आहे.
असे ते कार्यशाळेत दिवस प्रचंड भारलेले होते. ज्ञानदेव या माझ्या मित्राकड मी थांबलो होतो. सकाळी आवरून खांद्याला शबनम पिशवी अडकवून, अंगात नेहरुवजा शर्ट घालून मी निघायचो. तिथपासून झोपेपर्यंत डोक्यात आणि समोर फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमा होता.
कार्यशाळा ११ सप्टेंबरला संपली. १२ पासून राज्यसेवा mains होती. मी पहिल्या दिवशीचे भाषेचे पेपर दिले. पण डोक्यात फक्त आधीच्या एक आठवड्यातील सगळ्या गोष्टी फिरत होत्या. १३ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी GS चे पेपर सुरू झाले. १३ ला माझा २५ वा जन्मदिवसही होता. मी GS १ चा पेपर दिला. परिक्षागृहात मी पेपर समोर धरून बसलो होतो. अभ्यास झाला नव्हताच आणि डोक्यात सारखे ते चित्रपट घुमत होते. अभ्यास न झाल्यानं वाईट वाटलं. मी दुसरा GS २ चा पेपर दिला नाही. तसाच रूमवर आलो. माझी शबनम पिशवी घेतली, ज्यात कार्यशाळेत खरेदी केलेली पुस्तकं होती. मी अप्पा बळवंत चौकात जाऊन आणखी एकदोन पुस्तक घेतली. मग बालगंधर्व कलादालनात कुठलतरी प्रदर्शन लागलेलं ते पाहिलं आणि बाहेर येऊन पाच साडेपाचपर्यंत पुस्तकं वाचत बसलो. "अर्धसत्य" ज्या मूळ कथेवरून बनवलेला होता ती श्री. दा. पानवलकरांची बहुतेक "सुर्या" ही कथाही त्यावेळी वाचल्याचं चांगलं आठवतंय. मग संध्याकाळी रूमवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला आलो.
त्यानंतर सलग तीन वर्षे मला राज्यसेवा पूर्व पास होता आलं नाही. दरम्यान आणखी भरपूर चित्रपट पाहून झाले. दरवर्षीचे KIFF झाले, नाट्यस्पर्धा झाल्या. पुण्यातल्या कार्यशाळेला जाण्याआधीच किशोरदांच BDO म्हणून selection झालं होतं. त्यांची सुरुवातीला रत्नागिरी आणि आता फलटणला posting झाली आणि मग परत "आली लहर केला कहर" असला कार्यक्रमही झाला नाही. KIFF साठी मला नवे जोडीदार मिळाले माझे दुसरे roommate रवीदा. कोल्हापुरातील राज्य नाट्य स्पर्धांची जवळजवळ सगळी नाटक मी, शिवराज, किरण, रवी, धीरज, अनिकेत, अनिरुद्ध सगळ्यांनी न चुकता पहिली. जवळजवळ प्रत्येक शनिवारचा release कोल्हापुरात मी मित्रांबर आणि कुणी नसेल तर एकट्याने पहिला.
दरवर्षी राज्यसेवेची जाहिरातही येत राहिली. जाहिरात आल्यावर न चुकता आणि मनापासून अभ्यास आणि परीक्षा देत राहिलो. पण एक अडचण प्रत्येकवेळी व्हायची. अभ्यास करताना एखाद्या गोष्टींबद्दलचं कुतुहल जागृत व्हायचं आणि मग त्या गोष्टीबद्दलच जास्तीत जास्त जाणून घ्यायला लागायचो आणि फिरून शेवट सिनेमात व्हायचा. म्हणजे दोन्ही एकमेकात मिसळून जायचं. मी २०१७ मध्ये "हिंदू" वाचायला घेतली. पहिली दोन-तीनच पानं वाचून झाली आणि मला जाणवलं की पाहिलं मी प्राचीन भारत नीट वाचला पाहीजे. दरम्यान राज्यसेवा पूर्वपरीक्षाही आली होतीच. मग मी जुन्या NCERT मधून प्राचीन भारत वाचायला सुरुवात केली. मग हडप्पा बद्दल आणखी वाचू वाटलं मग नव्या NCERT मधील तेवढी प्रकरण वाचली. आणि मग श्याम बेनेगल यांचे "भारत एक खोज" चे एपिसोड बघायला लागलो. यातच भरपूर वेळ गेला. बाकी विषयांना जास्त वेळ मिळाला नाही. परीक्षा पास होता आली नाही. गेल्यावर्षी "भारत एक खोज"चे राहिलेले सगळे episodes पाहिले आणि "हिंदू" वाचून पूर्ण केली. भारताच्या इतिहासात कालातीत भ्रमण करणाऱ्या आणि आदिम कृषिसंस्कृतीशी जोडलेली नाळ याची जाणीव निर्माण करणाऱ्या नेमाडेंच्या "हिंदू"साठी प्राचीन-मध्ययुगीन इतिहास माहीत असणं ही गरज होतीच. "हिंदु"बद्दलही लिहायचं आहेच, वर्तमानाच्या संदर्भात तर ती जास्तच प्रासंगिक आहे, पण त्याबद्दल नंतर लिहीन.
भारत एक खोज झाल्यानंतर "संविधान" संपवली. मग मात्र इतिहासातले काही चरित्रपट पाहिले. रिचर्ड अटेनबर्ग यांचा "गांधी", जब्बार पटेलांचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर" पहिला. वेद राही यांचा "वीर सावरकर" पहिला. श्याम बेनेगल यांची पंडित नेहरुंवरील "नेहरू" ही डॉक्युमेंटरी पहिली, त्यांचाच "नेताजी बोस : द फरगॉटन हिरो" पहिला. तरी केतन मेहतांचा "सरदार" आणि जिनांवरील ब्रिटिश चरित्रपट राहिलाच. एकंदरीत २०१८ हे वर्ष माझ्या ऐतिहासिक चित्रपट महोत्सवाचं वर्ष होतं.
डिसेंबर उजाडला. १० डिसेंबर २०१८, राज्यसेवेची जाहिरात आली. मी ऐतिहासिक चित्रपट महोत्सव थांबवला. अभ्यास परत सुरू झाला. १७ फेब्रुवारी ला पूर्वपरीक्षा आहे. मला अभ्यासात चालू घडामोडी अभ्यासायला जास्त आवडतात. बरीच नवी माहिती मिळते, नव्या गोष्टी समजतात.
काल ऑफिसवरून घरी आल्यावर जेवण झाल्यावर गणितं सोडवत बसलो होतो. नंतर सकाळची वार्षिकी वाचायला घेतली. आवडीचा (आणि प्रश्न येऊ शकणारा) व्यक्तिविशेष हा भाग वाचायला सुरू केला. आणि संतुरवादक पंडित उल्हास बापट यांच्याबद्दल वाचू लागलो. त्यात पुढील उल्लेख होते :
'या वाद्यावर त्यांनी "मिंड" किमया विकसित केली आणि अविरत संशोधनातून क्रोमॅटिक संतुरचा जन्म झाला.'
पुढं पंचमदांबरोबर "घर" चित्रपटापासून त्यांनी संतूर वाजवायला सुरुवात केल्याचा आणि "इजाजत", "जैत रे जैत", "१९४२ a love story" साठी त्यांनी संतूर वाजवल्याचं वाचलं.
मी पुस्तक बंद केलं आणि youtube वर पंडित उल्हास बापट search केलं. त्यांच्या एका कार्यक्रमाचा एक video मिळाला. तो पहिला आणि मी त्यात हरवून गेलो. त्यांनी शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत दोन्हीत काम केलंय. शास्त्रीय सांगितातले काही जाणकार सिनेमाच्या संगिताला कमी प्रतीचं मानतात तर इंडस्ट्रीतील काही लोक शास्त्रीय संगीताला महत्व देत नाहीत. पण दोन्ही महत्वाची आहेत असही ते सांगतात. त्यांनी मिंड म्हणजे काय ते वाजवून दाखवलं. त्या व्हिडिओत त्यांनी पंचमदांना मिंडच रेकॉर्डिंग ऐकवल्याचं आणि त्यांना ते खूप आवडल्याचं सांगितलं. "तुने ये कैसे किया?" असं विचारून याचा वापर आपण करू असं पंचमदा त्यांना म्हणाले. पंचमदांनी त्याचा वापर "मेरा कुछ समान" मध्ये केल्याचं समजलं. मेरा कुछ सामान मध्ये "...पतझड है कुछ...है ना" यानंतर वाजणारं संतूर, "होठो पे बीती बात आयी है...(अंगुर)" या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये वाजणार संतूर. गाणं ऐकताना हात नकळत ज्या आवाजाबरं हवेत फिरायचा,ते वाजणारं काय होतं याचा कधी विचार केला नव्हता पण ते आवडायचं मात्र खूप. या दोन्ही आवडीच्या गाण्यातल्या नकळत आवडत्या जागा संतूरमुळं मला आवडत होत्या. हे सगळं ऐकून मी पुन्हा ती दोन्ही गाणी बारकाईनं ऐकली आणि त्या संतुरचा आनंद घेतला. पूर्वी ती गाणी ऐकताना शब्द ऐकण्यावर भर होता. उल्हास बापटांनी पंचमदांना अगदी "१९४२ a love story" पर्यंत साथ दिली. त्यातल्या गाण्यातही त्यांचंच संतूर आहे. ते अजून ऐकायचंय. "मेरा कुछ सामान.." तर फिरून फिरून कुठल्यातरी निमित्तानं समोर येतच राहत! गुलजार नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो.
खरं तर अभ्यासातही शिस्त पाहिजे. मी तेवढं वाचून पुढं जायला हवं होतं. पण तेवढ्या दोन परिच्छेदांवरून मी तास-दिडतास पंडित बापटांच्या संतुरमध्ये हरवून गेलो. मग भानावर आल्यावर मला जुनं सगळं आठवलं. पण जर मी तेवढा परिच्छेद वाचून पुढं गेलो असतो तर कदाचित माझा वेळ गेला नसता, आणखी वाचून झालं असतं. कदाचित हे दोन परिच्छेद वाचले त्यावर प्रश्न येणारही नाही. पण त्या गेलेल्या दीड तासाने मला खूप आनंद दिला, त्याची किंमत नाही होऊ शकत.
अणुबॉम्बमध्ये साखळी अभिक्रिया होऊन प्रचंड मोठा स्फोट होतो. ती अनियंत्रित साखळी अभिक्रिया असते. बाहेर पडणारे neutron आणि निर्माण होणारे तिप्पट neutron हे अनियंत्रित साखळी अभिक्रियेद्वारे क्षणार्धात मोठा स्फोट घडवून आणतात. वीजनिर्मितीसाठी वापरली जाणारी अणुऊर्जा मात्र नियंत्रित साखळी अभिक्रियेतून निर्माण होते. तिथं एक शिस्त असते. माझ्या MPSC च्या अभ्यासातून बाहेर पडणारे कुतूहलाचे कण मला चित्रपटांकडे नेतात आणि तिथून परत MPSC च्या अभ्यासाकडे आणतात. अशी साखळी अभिक्रिया कधीच सुरू झालीय. अनियंत्रित साखळी अभिक्रियेत लगेच होणारा स्फोट माझ्या बाबतीत लगेच होईल. वेळ सापेक्ष आहे. आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्षे म्हणजे interstellar मधील दुसऱ्या सूर्यमालेतल्या ग्रहावरील काही तास असतील. तिथल्या हिशेबान स्फोट पंधरा मिनिटं, अर्धा तास किंवा तासात होईलच. त्या स्फोटाने कुणाचं नुकसान मात्र होणार नाही. आनंद देणारा स्फोट असेल तो. तोपर्यंत MPSC च्या बाबतीत एकतर हवी ती post मिळेल नाहीतर परीक्षा देण्याचं वय संपेल. काहीतरी होईलच. सिनेमा आणि MPSC मुळं निर्माण झालेलं कुतूहल मात्र शेवटपर्यंत राहीलच.
पंडित उल्हास बापटांचा youtube वरील कार्यक्रम :
https://youtu.be/v45WeOwKk9I
https://youtu.be/Mqit4mp0Swo
(पूर्ण.)
- अभिजीत.




