बिल्लूनं मोक्याच्या रस्त्यावर एक "चमन बहार" नावाची पान-टपरी थाटलीय, पण नेमकं जिल्ह्याचं ठिकाण बद्दलल्यामुळं तो रस्ता आता मोक्याच्या राहिला नाही, गिऱ्हाईकं एकदम कमी झालीत. अशातच त्याच्या टपरीच्या समोरच्या बरेच दिवस बंद असलेल्या बंगल्यात एक सरकारी अधिकारी राहायला येतात, त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब, आणि महत्वाचं त्यांची शहरात वाढलेली मुलगी राहायला येते. ते राहायला येतात तशी त्या शहरातून आलेल्या मुलीमागं गावातल्या मुलांची टपरीकडं वर्दळ वाढत जाते, ती टपरी अशा मुलांचा अड्डाच बनते. त्यांच्यात विशेषतः त्या भागातील काही मोठ्या धेंडांच्या मुलांच्यात त्या मुलीसाठी स्पर्धा सुरू होते. टपरी थाटलेला बिल्लूही गुपचूप तिच्या प्रेमात असतो.
बस इस टाइप की ष्टोरी है |
पण "हे चित्र कसं काढलंस?" म्हटल्यावर "कागद घेतला, पेन्सिलने चित्र काढलं,मग रंग घेतले, ब्रश घेतला आणि पेन्सिलने काढलेलं चित्र रंगवलं, झालं चित्र." एवढंच सांगितल्यावर जशी ती चित्र काढण्याची क्रिया पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद मिळत नाही, तसंच ष्टोरी सांगून चित्रपटाचा आनंद मिळवता येत नाही. (अर्थात हा चित्रपट कलात्मक प्रकारचा - arthouse आहे अस मी म्हणत नाही, anology म्हणून चित्राचं उदाहरण दिल आहे.)
मोबाईलयुग सुरू होण्याच्या पूर्वीचा काळ आहे, खूप जुना, पण लोकप्रिय ९० च्या दशकांचा नाही. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा आहे. मोठ्या व्यक्तींकडंच मोबाईल असणं, एका स्थानिक राजकारण्याच्या कार्यालयात भिंतीवर ओबामाचं "hope" हे लोकप्रिय पोस्टर (!) असणं असे काही संदर्भ नकळत काळ उभा करतात. बिल्लूचं घर, त्याची टपरी, शेजारचा कॅरमअड्डा, cbz - excel गाड्या, रेंजर सायकल, गावाच्या पाट्या, टपरीशेजारच्या अड्ड्यावर जमणारं पब्लिक, अड्ड्यावरील दोन मोठे स्पर्धक, दोघांकडून फायदा करून घेणारे दोन मित्र, त्यांच्यातल्या एकाच्या खिशाला सारखं अडकवलेलं असणारं रेनॉल्ड - लेक्सीसदृश पेन, रॅपिडेक्स इंग्लिश कोर्सचं पुस्तक अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींनी मस्त माहोल तयार केलाय. सगळ्यात भारी टपरी, शेजारचा अड्डा, आणि समोरचा बंगला आहे. त्यांच्यात कथा पुढं सरताना होत जाणारा बदल मला खूप आवडला. "चमन बहार" नावाची ती टपरी हेच मुख्य पात्र असावं इतकी मला ती आवडली. अर्धवट उडालेल्या - बदलणाऱ्या रंगाची, त्यातील "बाबा तंबाखू" वाल्यांचं घड्याळ, आरसा, लक्ष्मीचा लावलेला फोटो, गुटख्याच्या माळा, पान, नंतर बिल्लूनं लावलेली पाटी, ३१ डिसेंम्बरला खेळवलेली लायटिंग असा मेकअप केलेली, बिल्लूला लपवणारी टपरी, ...मध्येच उधळून लावलेली, कोलमडलेली... आणि शेवटी पुन्हा रस्ता ओसाड झाल्यावर, दुकानाची गिर्हाईकं कमी झाल्यावर, गुटखा माल नसणारी, एक गुलाबी कागद फ्रेम करून लावलेली टपरी. बिल्लूच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्याच्या भावना जणूकाही ती टपरीही व्यक्त करत होती. तो प्रेमात पडल्यावर आनंदी असणारी, त्याला "ती येईल बघ आता" असं सांगणारी, त्याला मारल्यावर स्वतःही मार खाल्लेली, ती बांगला सोडून गेल्यावर त्याच्यासारखीच उदास, रिकामी झालेली, आणि त्याच्या मनात असलेल्या तिला जपणारी ती टपरी, जणूकाही प्रेमात पडलेल्या, म्हणजे अगदी दर्दी झालेल्या मित्राची काळजी करणारे जिवाभावाचे दोस्त असतात तशीच वाटली किंवा होती ती टपरी. बिल्लू मनातलं कुणाला सांगत नव्हता, ते फक्त त्याला आणि त्या टपरीलाच माहीत होतं. त्यामुळं चित्रपटातील मला सगळ्यात आवडलेलं पात्र ती "चमन बहार" टपरी आहे.
टपरीनंतर मला आवडलेलं पात्र आहे बिल्लू, अर्थात जितूकुमारचं. त्याची "पंचायत" या वेबसिरीजमधून पहिल्यांदा ओळख झाली. त्याच काम खूप आवडलं. विशेषकरून तो जेव्हा चिडतो, रागावतो तेव्हा मजा येते. मला तर तो एक वेगळ्या प्रकारचा angry young man वाटतो. त्याच्या संतापात आदळआपट किंवा मोठ्या आवाजातील बडबड नसते, पण त्याची संतापलेली देहबोली वैशिष्ट्यपूर्ण असते. फक्त त्यानं साचेबद्ध होऊ नये किंवा तशाच भूमिका येऊ नयेत असं वाटतं. बाकी बरीच पात्रं अशा टपऱ्यांभोवती, अड्ड्यांभोवती प्रत्यक्ष जाऊन उचलली असावी अशी मजेशीर आहेत. त्या भागातील वजनदार घरांतील, त्या मुलीच्या मागावर असणारे स्पर्धक भैय्या-भाऊ-दादा चांगले आहेत, पण इतके जास्त भिडले नाहीत. त्यापेक्षा त्या भैय्या-भाऊ-दादांच्या स्पर्धेचा फायदा घेणारे, एकमेकांना आणि इतरांना "डॅड्डी" म्हणून हाका मारणारे दोन कार्टून मित्र मात्र मजेशीर आहेत. त्या भागातील एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचा मुलगाही सुप्त स्पर्धक आहे. तो दिलजले टाइप, विषारी प्राणी आहे, तोही खूप मजेशीर आहे. एक गांजा पिणारा भगवी कपडे घातलेला विरक्ती घेतलेला बाबाही आहे. त्याचं विरक्तीचं कारण आणि ते बिल्लूला समजतं तो प्रसंग एकाचवेळी मजेशीर आणि करुणही आहे. बाकी पोलीस दमदार आहे, मुलीचे आणि बिल्लूचे आपापल्या कारणांनी कहिसे हतबल वडील, आणि इतर पात्रं आवडली. मुलीचं पात्र साकारणाऱ्या रितीकाला एकही वाक्य नसलं तरी तिचं असणं, बघणं हेच तिच्या भोवताली घायाळ करणारं वातावरण निर्माण करतं. असं वातावरण आपण कधीतरी अनुभवलेलं असतं. ती एकच असते, आणि भवतालाची कित्येक मुलं दर्दी, घायाळ झालेल्या अवस्थेत असतात. कुणी "शायनिंग मारतं", कुणी हातावर तीच्या नावाचं आद्याक्षर गोंदवून घेतं. पागल झालेले असतात सगळे. अशा तिचं पात्र आणि भवतालावरचा प्रभाव रितिका निर्माण करते.
पार्श्वसंगीत बिल्लूच्या मनातलं व्यक्त करत, आपल्याला बिल्लूशी भिडवतं. दिग्दर्शक अपूर्व बदगायियानं लिहिलेली आणि रोमी व सोनू निगम यांनी गायलेली "दिल धून धून" आणि "दो का चार.." ही गाणी खूपच आवडली. म्हणजे ट्रेलर पाहतानाच चित्रपट कसा असले याची कल्पना ट्रेलरमधील गाण्याच्या, संगीताच्या तुकड्यावरून आलेली.
एकूण मला खूपच आवडला. नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, तिथं पहा. त्यांचा १९९ चा पॅक आहे तो घ्या. नसेल घ्यायचा तर पहिला महिना subscription मोफत आहे ते घेऊन पहा. नाहीतर मित्राचं login id आणि पासवर्ड थोड्या वेळासाठी घेऊन पहा. कृपया pirated copy पाहू नका. गेल्याच आठवड्यात सगळ्यांनी nepotism चा निषेध करणारे स्टेटस टाकले होते. या सिनेमात (माझ्या माहितीप्रमाणे) इंडस्ट्री मधील कुठला कलाकार नाही की बड्या स्टारची मुलं नाहीत. तेव्हा pirated copy पाहून त्यांचं नुकसान करू नका.
(Caution : एखाद्यादुसऱ्या प्रसंगात शिवराळ भाषेचा वापर आहे.)
बस इस टाइप की ष्टोरी है |
पण "हे चित्र कसं काढलंस?" म्हटल्यावर "कागद घेतला, पेन्सिलने चित्र काढलं,मग रंग घेतले, ब्रश घेतला आणि पेन्सिलने काढलेलं चित्र रंगवलं, झालं चित्र." एवढंच सांगितल्यावर जशी ती चित्र काढण्याची क्रिया पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद मिळत नाही, तसंच ष्टोरी सांगून चित्रपटाचा आनंद मिळवता येत नाही. (अर्थात हा चित्रपट कलात्मक प्रकारचा - arthouse आहे अस मी म्हणत नाही, anology म्हणून चित्राचं उदाहरण दिल आहे.)
मोबाईलयुग सुरू होण्याच्या पूर्वीचा काळ आहे, खूप जुना, पण लोकप्रिय ९० च्या दशकांचा नाही. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा आहे. मोठ्या व्यक्तींकडंच मोबाईल असणं, एका स्थानिक राजकारण्याच्या कार्यालयात भिंतीवर ओबामाचं "hope" हे लोकप्रिय पोस्टर (!) असणं असे काही संदर्भ नकळत काळ उभा करतात. बिल्लूचं घर, त्याची टपरी, शेजारचा कॅरमअड्डा, cbz - excel गाड्या, रेंजर सायकल, गावाच्या पाट्या, टपरीशेजारच्या अड्ड्यावर जमणारं पब्लिक, अड्ड्यावरील दोन मोठे स्पर्धक, दोघांकडून फायदा करून घेणारे दोन मित्र, त्यांच्यातल्या एकाच्या खिशाला सारखं अडकवलेलं असणारं रेनॉल्ड - लेक्सीसदृश पेन, रॅपिडेक्स इंग्लिश कोर्सचं पुस्तक अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींनी मस्त माहोल तयार केलाय. सगळ्यात भारी टपरी, शेजारचा अड्डा, आणि समोरचा बंगला आहे. त्यांच्यात कथा पुढं सरताना होत जाणारा बदल मला खूप आवडला. "चमन बहार" नावाची ती टपरी हेच मुख्य पात्र असावं इतकी मला ती आवडली. अर्धवट उडालेल्या - बदलणाऱ्या रंगाची, त्यातील "बाबा तंबाखू" वाल्यांचं घड्याळ, आरसा, लक्ष्मीचा लावलेला फोटो, गुटख्याच्या माळा, पान, नंतर बिल्लूनं लावलेली पाटी, ३१ डिसेंम्बरला खेळवलेली लायटिंग असा मेकअप केलेली, बिल्लूला लपवणारी टपरी, ...मध्येच उधळून लावलेली, कोलमडलेली... आणि शेवटी पुन्हा रस्ता ओसाड झाल्यावर, दुकानाची गिर्हाईकं कमी झाल्यावर, गुटखा माल नसणारी, एक गुलाबी कागद फ्रेम करून लावलेली टपरी. बिल्लूच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्याच्या भावना जणूकाही ती टपरीही व्यक्त करत होती. तो प्रेमात पडल्यावर आनंदी असणारी, त्याला "ती येईल बघ आता" असं सांगणारी, त्याला मारल्यावर स्वतःही मार खाल्लेली, ती बांगला सोडून गेल्यावर त्याच्यासारखीच उदास, रिकामी झालेली, आणि त्याच्या मनात असलेल्या तिला जपणारी ती टपरी, जणूकाही प्रेमात पडलेल्या, म्हणजे अगदी दर्दी झालेल्या मित्राची काळजी करणारे जिवाभावाचे दोस्त असतात तशीच वाटली किंवा होती ती टपरी. बिल्लू मनातलं कुणाला सांगत नव्हता, ते फक्त त्याला आणि त्या टपरीलाच माहीत होतं. त्यामुळं चित्रपटातील मला सगळ्यात आवडलेलं पात्र ती "चमन बहार" टपरी आहे.
टपरीनंतर मला आवडलेलं पात्र आहे बिल्लू, अर्थात जितूकुमारचं. त्याची "पंचायत" या वेबसिरीजमधून पहिल्यांदा ओळख झाली. त्याच काम खूप आवडलं. विशेषकरून तो जेव्हा चिडतो, रागावतो तेव्हा मजा येते. मला तर तो एक वेगळ्या प्रकारचा angry young man वाटतो. त्याच्या संतापात आदळआपट किंवा मोठ्या आवाजातील बडबड नसते, पण त्याची संतापलेली देहबोली वैशिष्ट्यपूर्ण असते. फक्त त्यानं साचेबद्ध होऊ नये किंवा तशाच भूमिका येऊ नयेत असं वाटतं. बाकी बरीच पात्रं अशा टपऱ्यांभोवती, अड्ड्यांभोवती प्रत्यक्ष जाऊन उचलली असावी अशी मजेशीर आहेत. त्या भागातील वजनदार घरांतील, त्या मुलीच्या मागावर असणारे स्पर्धक भैय्या-भाऊ-दादा चांगले आहेत, पण इतके जास्त भिडले नाहीत. त्यापेक्षा त्या भैय्या-भाऊ-दादांच्या स्पर्धेचा फायदा घेणारे, एकमेकांना आणि इतरांना "डॅड्डी" म्हणून हाका मारणारे दोन कार्टून मित्र मात्र मजेशीर आहेत. त्या भागातील एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचा मुलगाही सुप्त स्पर्धक आहे. तो दिलजले टाइप, विषारी प्राणी आहे, तोही खूप मजेशीर आहे. एक गांजा पिणारा भगवी कपडे घातलेला विरक्ती घेतलेला बाबाही आहे. त्याचं विरक्तीचं कारण आणि ते बिल्लूला समजतं तो प्रसंग एकाचवेळी मजेशीर आणि करुणही आहे. बाकी पोलीस दमदार आहे, मुलीचे आणि बिल्लूचे आपापल्या कारणांनी कहिसे हतबल वडील, आणि इतर पात्रं आवडली. मुलीचं पात्र साकारणाऱ्या रितीकाला एकही वाक्य नसलं तरी तिचं असणं, बघणं हेच तिच्या भोवताली घायाळ करणारं वातावरण निर्माण करतं. असं वातावरण आपण कधीतरी अनुभवलेलं असतं. ती एकच असते, आणि भवतालाची कित्येक मुलं दर्दी, घायाळ झालेल्या अवस्थेत असतात. कुणी "शायनिंग मारतं", कुणी हातावर तीच्या नावाचं आद्याक्षर गोंदवून घेतं. पागल झालेले असतात सगळे. अशा तिचं पात्र आणि भवतालावरचा प्रभाव रितिका निर्माण करते.
पार्श्वसंगीत बिल्लूच्या मनातलं व्यक्त करत, आपल्याला बिल्लूशी भिडवतं. दिग्दर्शक अपूर्व बदगायियानं लिहिलेली आणि रोमी व सोनू निगम यांनी गायलेली "दिल धून धून" आणि "दो का चार.." ही गाणी खूपच आवडली. म्हणजे ट्रेलर पाहतानाच चित्रपट कसा असले याची कल्पना ट्रेलरमधील गाण्याच्या, संगीताच्या तुकड्यावरून आलेली.
एकूण मला खूपच आवडला. नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, तिथं पहा. त्यांचा १९९ चा पॅक आहे तो घ्या. नसेल घ्यायचा तर पहिला महिना subscription मोफत आहे ते घेऊन पहा. नाहीतर मित्राचं login id आणि पासवर्ड थोड्या वेळासाठी घेऊन पहा. कृपया pirated copy पाहू नका. गेल्याच आठवड्यात सगळ्यांनी nepotism चा निषेध करणारे स्टेटस टाकले होते. या सिनेमात (माझ्या माहितीप्रमाणे) इंडस्ट्री मधील कुठला कलाकार नाही की बड्या स्टारची मुलं नाहीत. तेव्हा pirated copy पाहून त्यांचं नुकसान करू नका.
(Caution : एखाद्यादुसऱ्या प्रसंगात शिवराळ भाषेचा वापर आहे.)
- अभिजित कदम.
[ गेल्या एक-दोन आठवड्यापासून समाजमाध्यमांवर nepotism वर खूप गरम चर्चा झाली. नव्या लोकांना संधी नाकारली जाते. सलमान खानसहित सगळ्या बड्या नावांमुळं, स्टार लोकांमुळं अनेक हुशार अभिनेत्यांना संधी मिळाली नाही, मिळत नाही हे वास्तव आहे. पण आपण आजपर्यंत इरफान, तापसी, नवाज, कंगना, सुशांत सिंग, राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा यांचे किती चित्रपट थिएटरला जाऊन पाहिले? यांचे पायरेटेड चित्रपट मोबाईलवर पाहायचे किंवा पहायचेच नाहीत, आणि nepotism वर चर्चा करायची हे थांबलं पाहिजे. आणि हो, मी या सगळ्यांचे चित्रपट फक्त थिएटरवर किंवा OTT प्लॅटफॉर्मवरच पाहिले आहेत. आवडला तर एकापेक्षा जास्त वेळा पाहिले आहेत. आणि हेसुद्धा खरं आहे की सलमानचे चित्रपटही ४-५ वेळा पाहिले आहेत. फक्त चुकलं इतकंच की त्याचे फालतू दर्जाहीन चित्रपटही थिएटरवर जाऊन दोन-तीनदा पाहिले. इथून पुढं ही चूक अजिबात करणार नाही. पण अर्थात मी सलमान-शाहरुख-आमिर किंवा आलीया-करण जोहर यांचेही चांगले चित्रपट (जेव्हा थिएटर सुरू होईल तेव्हा) थिएटरला पाहणार. मला टोकाची भूमिका, प्रतिक्रिया आवडत नाही, आणि न घेण्याचा प्रयत्नही असेल. बऱ्याच लोकांना अजिबात आवडत नसला, किंवा nepotism म्हणून तिरस्कार असला तरी मला सलमानचा "सुलतान" शाहरुखचा "चक दे" आमिरचा "तारे जमीन पर", "3 idiots" रणबीरचा "रॉकस्टार" आलीया चा "हायवे" हे चित्रपट थिएटरमध्येच पाहायला आवडतील, पाहीन. त्याचसोबत कंगणाचे, तापसीचे, नवाजुद्दीनचे, आयुष्यमान चे, राजकुमार रावचे, जितेंद्र कुमारचे चित्रपट आजपर्यंत थिएटरमध्येच पाहिलेत, आणि पुढेही पाहीन. ]



No comments:
Post a Comment